महाबळेश्वर तालुक्यात अतिवृष्टीने मृत झालेल्या २७ जनावरांच्या भरपाईसाठी आमदार मकरंद आबा पाटील यांची तातडीची पावले; तहसीलदारांना दिले आदेश
पांचगणी न्यूज नेटवर्क पांचगणी : सन २०२१-२०२२ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे महाबळेश्वर तालुक्यातील पशुपालक आणि पर्यटन व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीत तालुक्यातील २३ दुधाळ जनावरे आणि पाचगणी येथील पर्यटन स्थळांवर ओढकाम करणारी ४ अशी एकूण २७ जनावरे दगावली होती. या गरीब पीडित कुटुंबांना आणि व्यावसायिकांना आर्थिक न्याय मिळवून देण्यासाठी…