निसर्ग संवर्धनाचा अनोखा संदेश! वटपौर्णिमेचे औचित्य साधून आंब्रळ ग्रामपंचायतीकडून तब्बल २१ वटवृक्षांची लागवड
पांचगणी न्यूज नेटवर्क पांचगणी : केवळ पारंपरिक पद्धतीने सण साजरा न करता, बदलत्या हवामानात निसर्गाचे ऋण फेडण्याचा एक आदर्श वस्तुपाठ महाबळेश्वर तालुक्यातील आंब्रळ ग्रामपंचायतीने घालून दिला आहे. २९ जून रोजी असलेल्या वटपौर्णिमेच्या पवित्र दिनाचे औचित्य साधून आंब्रळ ग्रामपंचायतीच्या वतीने गावात तब्बल २१ वटवृक्षांची लागवड करून अत्यंत अनोख्या आणि पर्यावरणपूरक पद्धतीने हा उत्सव साजरा करण्यात आला….